मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते दोन या दीड तासाच्या वेळेत संपूर्ण देशभरातील एक कोटीहून अधिक ‘भाजप’ हितचिंतक व कार्यकर्त्यांशी ‘प्रधानमंत्री संघटन संवाद’ या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी ‘भाजप’ प्रदेश कार्यालय, नरिमन पॉइंट येथे टिव्ही स्क्रीनवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. या वेळी आमदार व प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर, खासदार विकास महात्मे, ‘भाजप’ प्रदेश माध्यम विभागप्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, ‘भाजप’ प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी आणि कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.